
राज्यव्याप्ती – भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणीनिस्तान, भूतान, इराण, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, पाटलीपुत्र (बिहार)
वडील- बिंदुसार
राजघराणे- मौर्यवंश
Chakaravarti ashok samrat|चक्रवर्ती अशोक सम्राट
हा भारतीय समाजातील सर्वात महत्वाचा लोककल्याणकारी राजा ज्याने अर्धा आशिया खंड काबीज केला होता. आपल्या सुमारे ४०वर्षाच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडील अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. अनेकांच्या मतानुसार, सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकाना भारताच्या इतिहासात हि सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच
तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’. जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होऊन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे मानतात कि प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान पूर्वेकडे बांगलादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ, भूतान, इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक हि युद्ध हरले नाहीत. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्यांच्या राज्याचे केंद्रस्थानाला ज्याला बिहार म्हणतात तो मगध होता, व आज पाटण म्हणून ओळखली जाणारी पाटलीपुत्र हि त्यांची राजधानी होती. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्मच्या प्रसारास समर्पित केले. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरावाला होता.
अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात त्यामुळेअशोकांबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे. सम्राट अशोक सत्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णुता आणि शाकाहारी जीवनप्रणाली यांचे थोर पुरस्कर्ते होते म्हणूनच एक अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख झाली आहे. अशोकाने आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शिलालेखांतून काही राजाज्ञा दिल्या आहे. अशोकाचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना अशोकाचे शिलालेख वाचता आले. ते अनेक भाषांचे अभ्यासक होते. अशोकाचे शिलालेख हे ब्राह्मी, खरोष्टी आणि अरेमाईक या तीन लिपींमध्ये आढळलेले आहेत. त्यातील अनेक अभिलेख हे ब्राह्मी लिपीतील असून ते जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले,
त्यातूनच या चक्रवर्ती सम्राटाच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्याचे विषयीची सखोल माहिती हि अभ्यासकांना मिळालेली आहे अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला ‘देवांना प्रिय’ असे संबोधले आहे. कलिंग युद्धानंतर त्याचे झालेले मनपरिवर्तन, त्याने स्वीकार केलेल्या बौद्ध धर्म, बौद्ध धर्माची तत्वे आणि ऐकूनच धर्मप्रसाराचे कार्य महामात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. सम्राट अशोक हा या काळातील भारतातील पहिला चक्रवर्ती राजा होय. सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ घोडा चारी दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक विजेता होय सम्राट अशोकाने प्रशासकीय संदर्भाने अनेक महत्वपूर्ण बदल केले. धर्मप्रसारणाला उत्तेजन दिले आपल्या मुलांनादेखील धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली प्रजा कल्याणाचे हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून लोकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला.
अशोकानंतर राज्याला योग्य उत्तराधिकारी न लाभल्यामुळे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास घडून आला विशाल आणि एकछत्री केंदीकृत राज्य उभारण्याचा प्रयत्न अखिल भारतीय स्तरावर सर्वप्रथम मौर्य सम्राट यांनी केला यामध्ये चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक यांचे कार्य खूप महत्वपूर्ण राहिलेले आहे अशोकाने बौद्ध धर्माची शिकवण देताना लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीला चालना दिली शांततेच्या मार्गाने कुठलेही राज्य जास्त काळ टिकू शकेल यावर त्याचा विश्वास निर्माण झाला. बौद्ध धर्माच्या प्रसाराला त्याने चालना दिले त्यासाठी शासकीय अधिकारी नेमले स्वतःच्या मुलांना त्याने धर्म प्रसारासाठी पाठवले.
सम्राट अशोक अति-महत्वाकांक्षी नव्हता. सीझरसारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता, पण आपण हुकूमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता.पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकाचा बाबतीत नव्हतं. प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावी, असं त्याला मनापासून वाटत असे. चेंगीझखान, तैमूर आणि रशियाच्या पहिल्या पीटरने त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती, तशी दहशत सम्राट अशोकाने कधीच बसवली नाही. मनाचा मोठेपणा, मनातील शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिक पणा, स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दल किंवा मान मारताबाबद्दल च्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या व्यकितमत्वाबद्दलची वैशिष्ट्ये होती.
बालपण व सुरुवातीची कारकीर्द
अशोक हा बिंदुसार या मौर्य सम्राटाचा पुत्र होता. बिंदुसार याना अनेक पत्नी होत्या, त्यातील धर्मा हि अशोकाची आई होती. अशोक हा बिन्दुसारच्या अनेक पुत्रांमधून शेवटून दुसरा होता. त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची अपेक्षा नव्हती. परंतु अशोकाची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुस्वास वाढला होता. चंद्रगुप्त मौर्याने जेंव्हा जैंन धर्म स्वीकारून राज्य सुखाचा त्याग केला, त्यावेळेस त्याने तलवार फेकून दिली. हि तलवार शोधून अशोकाने आपल्याजवळच ठेवली. अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होता. तसेच चांगलं शिकारीहि होता. त्याला तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्याच्यातील सेनानींचे गुण ओळखून बिंदुसाराने तरुणपणी त्याला अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते, हे काम त्याने सहज पार पाडले. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एक महान चक्रवर्ती सम्राट म्हणून अशोकाला मान्यता मिळालेली आहे. तत्कालीन अशोकाचे शिलालेख वस्तू हे याची साक्ष देणारे महत्वपूर्ण साधन आहे.
अशोक जसजसा सेनानी म्हणून परिपकव होत गेला तसतसे त्याच्या भावांचे त्यावरील दुस्वास हि वाढत गेला. अशोकाने मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते तसेच त्याच्या एका मागोमागच्या मोहिमेमुळे त्याची राज्यभर कीर्ती होऊ लागली. त्यामुळे त्याच्या भावांना असे वाटले कि बिंदुसार अशोक ला सम्राट बनण्यास प्राधान्य देतील. बिंदुसारचा ज्येष्ठ पुत्र सुशील हा अशोकचा दुस्वास करण्यात आघाडीवर होता. सुशीलने अशोकाला व्यस्त ठेवण्यासाठी जेथे सुशील अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते तेथे तक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितले. अशोक येण्याच्या बातमीने उठाव शमला व अशोकाची कीर्ती अजून वाढत गेली.
अशोकच्या यशाने त्याच्या भावांचा दुस्वास अजून वाढला, घरातील वाढत्या अशांततेमुळे व सुसीमने बिदूंसाराला अशोकविरुद्ध भडकवले, या वादातून तात्पुरता मार्ग म्हणून बिंदुसार ने अशोकला काही काळ अज्ञात वासात जाण्याचा सल्ला दिला,तो त्याने पाळला. या काळात अशोकने कलिंगमध्ये जाऊन वास्तव्य केले. या काळात त्याची कौरवाकी या कोळी मुलीशी ओळख झाली. ती नंतर अशोकाची दुसरी अथवा तिसरी पत्नी बनली. अशोकच्या काही कोरीवकामांवर तिचे उल्लेख आहेत. मध्यंतरीच्या काळात उज्जैन मध्ये हिंसक उठाव झाला, बिंदुसाराने अशोकला अज्ञातवासातून बाहेर येऊन हा उठाव शमण्यास सांगितले. अशोक उज्जेनला गेला व एका लढाईंत घायाळ झाला. त्या काळात असे मानतात कि सुसीमद्वारे अशोकवर अनेक हिंसक हल्ले झाले, जे परतावून लावण्यात आले. अशोकची शुश्रूषा करण्यासाठी बौद्धधर्मी परिचारिकांची नेमणूक करण्यात आली होती. यातील एक परिचारिका देवी हिच्याशी अशोकचा विवाह झाला. देवी हि विदिशा येथील एका व्यापाराची मुलगी होती. ती बौद्ध धर्मी असल्याने बिंदूसारला हा विवाह पसंत पडला नाही. त्याने अशोकला पाटलीपुत्र मध्ये राहण्यास मनाई केली व अशोकला उज्जैन येथील प्रमुख करून टाकले.
पुढील काही वर्ष अशोकाची शांततामय गेली. बिंदुसाराचे इसवी सन पूर्व २७३मध्ये निधन झाले व सुसीम अशोकचा काटा काढण्यास अजून सक्रिय झाला. या प्रयत्नात देवीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला,त्यात अशोकची आई मारली गेली. या घटनेने संतप्त झालेल्या अशोकाने पाटिलीपुत्रावर आक्रमण केले व लवकरच पाटलीपुत्राचा पाडाव केला. आपल्या सर्व बंधूंची हत्या केली. यानंतर अशोकाची महत्वाकांक्षा वाढीस लागली. मगध साम्राज्याचा सम्राट बनून त्याने अनेक प्रांत एकामागोमाग पार करण्याचा सपाटा लावला. या काळात अशोकला चंड-अशोक म्हणू लागले व एक क्रूरकर्मी अशी त्याची ओळख तयार होऊ लागली. राज्यरोहण झाल्यानंतर आठ वर्षाच्या काळात अशोकाने अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडले व मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रह्मादेशाच्या सीमेपर्यंत तर पश्चिमेकडे बलुचिस्तान-इराणच्या सीमेपर्यंत, उत्तरेस अफगाणिस्तान व दक्षिणेस केरळ पर्यंत वाढवला. जवळपास सर्व भारत त्याने एका साम्राज्याच्या छायेत आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली. संपूर्ण हिंदुस्थानात एकछत्री साम्राज्य उभारणार चक्रवर्ती सम्राट अशोकच्या नावाचा उल्लेख करावा लागतो. रोमिला थापर यांनी अशोकाच्या कार्याचा विशेष गौरव केलेला आहे.
कलिंगचे युद्ध
कलिंगचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा अध्याय आहे. अशोक वर नमूद केल्याप्रमाणे युद्धखोर झाला होता. सर्वत्र त्याची ओळख चंड अशोक म्हणून होऊ लागली होती. भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगड व झारखंड मधील काही भाग येतात. कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत. सामाजिक तसेच आर्थिक कारणे हि मुख्य मानली जातात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते. मौर्याच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते. तसेच बाह्य जगाशी व्यवसायवृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनाऱ्यावर सत्ता हवी होती, ती कलिंगकडे होती. तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही ते म्हणजे कलिंग हा खनिज समृद्ध देश होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले.कारणे असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती. युद्ध साधारणपणे इस पूर्व २६५ च्या सुमारास सुरु झाले. सुशीलच्या एक भावाने कलिंगाच्या राजाची मदत घेतली होती. अशोकने हे कारण मानले व कलिंगाच्या राजाला शरण येण्यास सांगितले.
सुरुवातीच्या लढायांमध्ये कलिंगाच्या सेनापतींनी चांगलीच झुंज दिली व अशोकाच्या सैन्याला मात दिली. या पराभवाने अजून अशोकाने चवताळून जाऊन अजून मोठया सैन्यासह कलिंगावर आक्रमण केले. कलिंगाच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढले परंतु अशोकाच्या सैन्य ताकद व सैनिकी डावपेचापुढे काही चालले नाही.अशोकाने पुढे सैन्याला संपूर्ण कलिंगमध्ये दहशत माजवली. मोठ्या प्रमाणावर लोकांचे शिरकाण करण्यात आले. या युद्धाच्या शिलालेखावरील नोंदीनुसार साधारणपणे १लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात आले. कलिंग युद्ध हे अशोकाच्या जीवनात एक महत्वपूर्ण घटना मानली जाते कलिंग युद्धानंतर त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्याने बौद्ध धर्मांचा स्वीकार केला एक नवा विचार स्वीकारून ठाणे आपली राजव्यवस्था अधिक सक्षम आणि दृढ केली त्याच्या शांततेच्या मार्गाचा सकारात्मक परिणाम राज्य व्यवस्थेवर झाला अशोकाने कलिंगचे युद्ध पार पाडल्यानंतर जिंकलेल्या रणांगणाची व शहरांची पाहणी करायची ठरवली, व त्यावेळेस त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेताचे ढीग, सडण्याचा दुर्गंध, जळालेली शेती व घरे व मालमत्ता पहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले, व हा विजय नाही तर पराजय आहे, असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे कि दंगल व बायका मुले व इतर अबलांचा
हत्या कशासाठी व यात कसला पराक्रम आहे कि दंगल, व बायका मुले व इतर अबलाचा हत्या कशासाठी व यात कसला पराक्रम असे स्वतःलाच प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्याचे अस्तित्व हिरावून घ्यायचे? ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसा, प्रेम,दया हि मूलभूत तत्वे असलेला बौद्ध धर्मियांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले.यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रूपांतर झाले.
Chakaravarti ashok samrat|चक्रवर्ती अशोक सम्राट
अशोकाने आपल्या कारकिर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्याच्या कडेला वृक्षांची लागवड हि अशोकाचीच कल्पना आहे, असे मानतात. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्म अशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्वे विशद केली, अहिंसा, सर्व जातीधर्माबद्दल सहिष्णुता, वडीलधाऱ्या माणसांना मान देणे, संताना,शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागविणे.अशा आचारतत्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही. अशोकाच्या इतिहासकारानुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये,चोल साम्राज्य याच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती.
सारनाथ येथील अशोक स्तंभ हा अशोकाचा सर्वात प्रसिद्ध स्तंभ मानला जातो.हा वालुकाश्माचा बनला असून अशोकाने सारनाथला भेट दिल्याची त्यावर नोंद आहे. त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले सिंह आहेत. हा स्तंभ आता भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरत आहे. इतिहासकारांसाठी व शास्त्रज्ञांसाठी अशोक कालीन चिन्हे,लेख,स्तंभाचा हा खूप महत्वपूर्ण ठेवा आहे. तो मौर्य साम्राज्यांबद्दल अनेक गोष्टी सादर करतो.
सैनिकी शक्ती
अशोकाच्या काळात त्यांची जगातील सर्वात मोठी सैन्य शक्ती होती. जरी कलिंग युद्धात खूप सैनिक मारले गेले,तरी संपूर्ण आशिया खंडात दबदबा निर्माण व्हावा एवढे प्रचंड सैनिकी सामर्थ्य सम्राट अशोकाचे होते.
सम्राट अशोकांचे सैन्यसामर्थ्य फार अचाट होते. जर या सम्राट अशोकांनी आपला साम्राज्य विस्तार करण्याचे ठरवले तर,या पृथ्वीवरील एकामागून एक देश जिंकून आपल्या अफाट साम्राज्यास जोडत गेले असते.सम्राट अशोकांचे गुप्तहेर खाते फार प्रभावी होते. त्यामध्ये महिला गुप्तहेरही होत्या.
सम्राट अशोकांनी कलिंग युद्धाच्या रक्तपातानंतर जरी शांतताप्रिय असा बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्यांनी आपले सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले होते.
हे पण वाचा:- कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवन प्रवास
हे पण वाचा:- झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन चरित्र