The BIography Of Chh. Sambhaji Maharaj|छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र

अधिकार काळ:- जानेवारी १६, इ.स. १६८१ मार्च ११, इ.स२ १६८९

राज्याभिषेक: जानेवारी १६, इ.स. १६८१

राज्यव्याप्ती:- पश्चिम महाराष्ट्र, कोकण ,सह्याद्री डोंगर रांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खान्देशापासून ते दक्षिण भारतात तंजावर पर्यंत

राजधानी:- रायगड

पूर्ण नाव:- छत्रपती संभाजी राजे शिवाजीराजे भोसले

जन्म:- १४ मे इ.स. १६५७ पुरंदर किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र

मृत्यू:- ११ मार्च, इ.स. १६८९ तुळापूर, महाराष्ट्र ( समाधी :वढू, महाराष्ट्र )

आई:- सईबाई

The BIography Of Chh. Sambhaji Maharaj|छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र

बालपण

संभाजी महाराजांचा जन्म १४ मे इ.स. ६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते.मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजी राजे ९वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मथुरेला ठेवले. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

तारुण्य

इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजी राजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.

मुद्रा व दानपत्र

श्री शंभो:शिवजातस्य मुद्रघोउरीव राजते।येदं कसेवींनी लेखा वतर्ते कस्यनोपरी ।।

अर्थ: छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची हि राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस,प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.

संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. जेष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेव भट्ट पुत्र बाकरे शास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो. छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी नामदेवभट्ट पुत्र बाकरे शास्त्री (ज्यांना संभाजी महाराज स्वामी म्हणतात) यांना दरसाल १०,००० होनाचे संस्कृत दानपत्र करून दिले. दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची १६ बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्य अक्षरात संस्कृतमध्ये २ ओळी लिहिल्या आहेत. त्या स्वतः शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहेत.

त्या ओळी खालीलप्रमाणे :
।।मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्री शंभूराज ।। ।। छत्रपते :यदत्रोपरीलेखित ।। छ।। श्री।।

यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतः च्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात. आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देव ब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शहाजी राजांस निष्ठायुद्ध प्रवीण, तसेच ‘हैंदवधर्मजीर्नोधारणघृतमती’ म्हणजे स्वतः चा जीव धोक्यात घालून हिंदवी धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संभोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंच्छ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्राना पराभूत केले असा करतात. यावरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन होते.

धार्मिक धोरण

दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपाळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे,…. राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य…. युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचिती येते. त्याचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.

संताजनास राजाश्रय

१. संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली.

२. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञा पत्र करून दिले.

३. समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. तेथील पूजेअर्चेसाठी व नैवैद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दिलेली सनद पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले.

४. प्रचंड गडच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली.

५.श्री समर्थानी अवतारकार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज,उत्सव,देवस्थानाची व्यवस्था,यात्रा, समर्थांच्या निर्वाण स्थळी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरवले. त्या संबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानउघाडणी देखील केली आहे. या संबंधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचे सुभेदार रंगो विश्वनाथ यांस श्री चे कार्यास हैगे कराया तुम्हास काय गरज?…अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे.

The BIography Of Chh. Sambhaji Maharaj|छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र

सक्तीने धर्मांतरास विरोध

छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराज व हेनरी ग्यारी यांच्यात इ.स. १६८४ साली झालेली तहातील एक कलम आहे,’That The English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians’

औरंगजेबाची दक्खन मोहीम

औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजी महाराजांपेक्षा जास्त होते. ते सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेब चे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटीने मोठे होते. त्याकाळी जगातील सर्वात शक्तीशाली सैन्यामध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी महाराजांच्या नेत्तृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छा शक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिक जवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती कि तो किल्ला काही तासातच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला कि तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्ब्ल साडेसहा वर्ष लढावे लागले. संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला कि त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली. इ.स. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती.

दगा फटका

इ.स. १६८९ च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ. स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकेल नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले.

महाराजांना वाचवण्याचे प्रयत्न

छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही. महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात यशस्वी झाले नाही. यात सर्वात पहिला प्रयत्न हा जोत्याजी केसरकर यांनी केला. पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले. पुढे जाऊन रायप्पा महार याही बहादूरगडावर महाराजांना वाचवण्याचे धाडस केले यात त्यांना वीरमरण आले.

शारीरिक छळ व मृत्यू

त्यानंतर संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लगार कवी कलश याना औरंगजेब पुढे बहादूरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. संभाजी महाराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेंव्हा औरंगजेबने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला.

साहित्य

अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शूर तेणे लढा देणारे संभाजी महाराज यांचे कुशल प्रशासन, धर्मवत्सलपणा, स्वाभिमान, धाडसी वृत्ती व प्रजेच्या कल्याणासाठी केलेले त्यांचे कार्य यामुळे इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले आहे.

हे पण वाचा:- लाल बहादूर शास्त्री यांचा जीवन प्रवास

हे पण वाचा:- नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे जीवन चरित्र